येवला सा. बां.विभाग अंतर्गत अंदरसुल - बोकटे रस्त्याचे वाजले कि बारा खड्ड्यात गेला रस्ता, चौकशी ची जाहीर मागणी

नाशिक प्रतिनिधी डॉ शेरु भाई मोमिन 


 येवला तालुक्यातील, सा. बां. विभाग अंतर्गत, मौजे अंदरसुल- बोकटे,येथील पाच किलोमीटर अंतरावरील अवघ्या काही महिन्यातच रस्ता संपूर्णपणे उधळून गेल्याने, या परिसरातील सर्व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, तसेच रस्त्याच्या आजूबाजूला, मोठ्या प्रमाणात काटवणाचे झाडे देखील रस्त्यावर आल्याने वाहने चालविने देखील अवघड झाले आहे तरी रस्त्याच्या आजू बाजूला साईड पट्ट्या देखील नसल्याने, अनेकदा नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे, सा. बां. विभाग येवला यांचा मनमानी कारभार केव्हा बंद होणार अशी मागणी या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी केली आहे ऐन जून महिन्यातील पावसाच्या झटक्याने संपूर्णपणे रस्त्याने खडी उधळून खड्डे मोठ्या प्रमाणात पडल्याने सर्वच प्रकारच्या वाहनचालकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तरी, गुणवत्ता नियंत्रण पथकाने उच्चस्तरीय समिती गठीत करून तात्काळपणे सखोल चौकशी करावी अशी मागणी या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी केली आहे अशाच प्रकारे येवला तालुक्यातील अनेक ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात फक्त दोन महिन्यातच खडी उधळून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे याकरिता अद्याप पावतो अधिकारी वर्ग कोणीच लक्ष केंद्रित करत नाही ही मोठी शोकांतिका येवला शहर व. तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे कोटमगाव लगत नाशिक - औरंगाबाद हायवे वरील, आजूबाजूला साईट पट्ट्या नसल्याने, मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य असल्याने काटवणाचे दोन्ही बाजूला झाडे वाढल्याने राज्य महामार्गावरील देखील अपघातांना आमंत्रण देण्याचे लक्षण या ठिकाणी निर्माण झाले आहे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी त्वरित पाहणी करून व सखोल नियंत्रण चौकशी समिती गठित करावी अशी मागणी येवला शहर व तालुका व परिसरातील पंचक्रोशीतील सर्वच प्रतिष्ठित ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे, ना. अजितदादा पवार ना.दादाजी भुसे, विभागिय महसूल अधिकारी नाशिक पालकमंत्री नाशिक यांच्या कडे पत्राद्वारे केली आहेत.

Comments