पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच पत्रकारांकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे:जाहीर मागणी

 प्रतिनिधि सत्तार खान की रिपोर्ट 

   औरंगाबाद :- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,सर्वच पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन, करून त्या मार्फत पत्रकारांना मानधन व. इतर सर्वत्र सोयी-सुविधा, सवलती देण्यासाठी राज्य शासनाने त्वरित उच्चस्तरीय समिती गठीत करावी,अत्यंत मूलभूत गरजेची हि जाहीर मागणी त्वरित मंजुर करावी अशी मागणी स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ,लोकशाही मराठी पत्रकार संघ, यांच्या वतीने महा. प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक, मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व. ना. अजितदादा पवार, यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्ताने आयोजित सर्व सदस्य,पदाधिकाऱ्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये, हा ठराव संमत करून शासनाकडे रवाना करण्यात आला आहे, यावेळी पंजाबराव वडजे पा.मुसा खान,सादिकभाई मोमीन,परवेज शेख,रियाजखान पठाण, पाशुभाई शेख,रेहान शेरूभाई मोमीन, ईमरानभाई मोमीन,हसनबाबा शेख, अ.रशीदबाबा शेख,बाबा फिटर, जाकीरभाई मोमीन, दादाभाई तांबोळी, गणपत जाधव,हाजी बदीऊज्जमा खान,असलम मणियार,अनिस मणियार, नशीरभाई शेख,सद्दाम पठाण,संतोष गायकवाड,ईम्रानभाई पठाण,अनिसभाई सैय्यद, धर्मराज अलगट,राजेंद्र गांगुर्डे, सोमनाथ रोकडे, जमील पटेल, समीरभाई सैय्यद,मोज्जम शेख, आरीफ शेख बोरसर, मोतीभाऊ वाघ, जाकीर पठाण, आदी सह सदस्य पदाधिकारी हितचिंतक कार्यकर्ते व. प्रमुख मान्यवर यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर पत्रकारांसाठी असलेल्या बाळशास्त्री जांभेकर निवृत्तीवेतन योजनेतील जाचक अटी त्वरित रद्द करून राज्य शासनाच्या घोषणेप्रमाणे प्रतिमा 20 हजार रुपये मानधन देण्यात यावे स्वाभिमानी पत्रकार संरक्षण कायद्याची स्थानिक पातळीवर त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण राज्य भर पोलीस प्रशासनाला स्वतंत्र आदेश द्यावेत सर्वच शहरी ग्रा. भागातिल पत्रकारांना व त्यांच्या सर्वच कुटुंबीयांना मोफत आरोग्य उपचार आणि विमा कवच द्यावे आधी स्वीकृती पत्रिका पत्रकारांना मिळावी यासाठी प्रक्रिया सुलभ करावी तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी वेतन पावतीची अट त्वरित रद्द करावी आदी सर्व जाहीर प्रमुख मागण्या यावेळी पत्रकार परिषदेमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.अन्यथा संपूर्ण राज्यभर दि.2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यभरातिल जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला आहे

Comments